जळगाव : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी आचार संहिता लागू असताना विनापरवानगी आणि अनधिकृतपणे वाढदिवसाचे फलक लावल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी जिल्ह्यातील हा पहिलाचा गुन्हा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आचारसंहिता लागू झाल्यावर जळगाव महानगरपालिकेने शहरातील सर्व राजकीय संघटनेचे पोस्टर्स, बॅनर, झेंडे, फलक आणि मतदारांवर प्रभाव पडेल अशा सर्व वस्तू हटविण्यात आल्या होत्या. दरम्यान, शहरातील आकाशवाणी चौकात सामाजिक वनीकरण विभागाच्या हद्दीत त्यांच्या मालकीच्या फलकावर आचारसंहिता असताना आज (ता.२३) निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाबाबत शिवसेना पक्षाच्या व्यक्तीसोबतचे फोटोंचे फलक लावून आचारसंहिता भंग गेली.
या प्रकरणी किरकोड वसुली विभागाचे लिपीक अजय उध्दव बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून सामाजिक वनिकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी, शिवसेनेचे निलेश पाटील आणि साईमोह क्रियेशन ॲडव्हरटायझर यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलिसात लोकप्रतिनिधी नियम कलम 126 सह महाराष्ट्र विद्रपीकरण अधिनियम सन 1995 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.