नवी दिल्ली ः पुढारी ऑनलाईन
दिल्लीमध्ये चिघळलेल्या आंदोलनावर अभिनेत्री कंगणा राणावतने संतप्त होऊन आपल्या ट्विटरवरून एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. कंगणा म्हणते की, "या देशाचं काही होणार नाही. हा देश केवळ एक चेष्टेचा विषय झालेला आहे. ज्यांनी हिंसक आंदोलन केले आहे, त्यांना सरळ कारागृहात टाका", अशी तिखट प्रतिक्रिया कंगणाने ट्विटरवर दिली आहे.
वाचा ः मुंबईच्या आंदोलनाला भेंडीबाजाराशी जोडणं दुर्दैवी : शरद पवार
कंगणा पुढे म्हणते की, "आज प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला. तिथे खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आहे. कोरोना संकटावर आपण यशस्वी मात करत पुढे गेलो. याशिवाय या संकट काळात आपण पूर्ण जगाचं प्रतिनिधित्व करत आहोत. मोजक्याच देशांना हे यश मिळालं आहे. त्याच देशांपैकी आपण एक आहोत", असंही कंगणा सांगत आहे.
Sick and tired of riots and blood bath almost every month , Delhi, Bangalore and now again Delhi #दिल्ली_पुलिस_लठ_बजाओ #RedFort pic.twitter.com/pWhXtOrqkx
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 26, 2021
वाचा ः दिल्लीतील हिंसाचारानंतर संजय राऊत म्हणाले...
सकाळी शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर कंगणा प्रतिक्रिया देताना सांगते की, "सकाळपासून लाल किल्ल्याचे फोटो येत आहेत. हे दहशतवादी जे स्वत:ला शेतकरी म्हणतात त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. सर्वांसमोर हा तमाशा सुरू आहे. आज जगात आपली चेष्टा केली जात आहे. आपली काहीच इज्जत राहिलेली नाही. जेव्हा दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष देशात येतो तेव्हा काही लोकं नग्न होऊन बसतात. या देशाचं काहीच होणार नाही. कुणी या देशाला एक पाऊल पुढे घेऊन जात आहे, तर काही लोक देशाला दहा पावलं मागे खेचत आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांना जेलमध्ये टाका. त्यांची संपत्तीदेखील हिसकावून घ्या", अशी जळजळीत प्रतिक्रिया कंगणा राणावतने दिली आहे.